पुणे – भारत देश हा सोन्याची खाण असल्याचे तसेच देशातून सोन्याचा धूर निघत असल्याचे सांगितले जात होते. आजही देशात सोन्याचे आकर्षण कमी झालेले नाही. गुंतवणूक म्हणूनही सोने खरेदीकडेच ग्राहकांचा कल असतो. अंगावर सोने मिरवणाऱ्यांमध्ये जगभरात भारतीय आघाडीवर आहेत. देशातील सोन्याच्या मागणीचा आलेखही गेल्या 50 वर्षांत खाली आलेला नाही. यापार्श्वभूमीवर भारतात वार्षिक 774 टन सोन्याच्या वापराच्या तुलनेत सुमारे 1.6 टन सोन्याचे उत्खनन केले जाते.
जगभरात सोने उत्खनन करणाऱ्या देशांच्या यादीत भारताचेही नाव अग्रस्थानी आहे. चीनमध्ये सर्वाधिक सोने उत्खनन केले जाते त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. जगभरातील अन्य देशांतून सोन्याला खूप मागणी असल्याने बहुतांशी अग्रेसर देशांत सोने उत्खनन केले जाते. दरवर्षी जमिनीतून किती सोने बाहेर काढले जाते, हा मौल्यवान धातू कच्चे सोने किंवा पारा, चांदीसह मिश्रधातूच्या स्वरुपात आढळतो. याशिवाय कॅल्व्हराइट, सिल्व्हनाइट, पॅटझाइट आणि क्रेनराइट धातूंच्या स्वरुपातही सोने आढळते.
देशातील सोन्याची खाणी…
जागतिक सुवर्ण परिषदेच्या अहवालानुसार, जगात सोन्याची खाण सुरू झाल्यापासून आतापर्यंत सुमारे 2 लाख टन सोने काढण्यात आले आहे. भारत देशात सर्वाधिक सोन्याचे उत्पादन कर्नाटकात होते. येथील कोलार सोन्याच्या खाणीतून मोठे उत्खनन होते. याशिवाय हुट्टी गोल्ड फिल्ड आणि उटी नावाच्या खाणीतूनही मोठ्या प्रमाणात सोने उत्खनन होते. आंध्र प्रदेश आणि झारखंड राज्यातील हिराबुद्दिनी आणि केंद्रुकोचा खाणींतही मोठ्या प्रमाणात सोने सापडते.
या खाणींद्वारे, देशात वार्षिक 774 टन सोन्याच्या वापराच्या तुलनेत सुमारे 1.6 टन सोन्याचे उत्खनन केले जाते जाते. तर जगभरातील खाणींतून दरवर्षी 3 हजार टन सोने उत्खनन केले जाते. जागतिक सुवर्ण परिषदेच्या अहवालानुसार, भारतातील महिलांकडे 21 हजार टन सोने आहे, हे प्रमाण मोठे आहे. जगातील पहिल्या 5 बॅंकांकडेही इतका सोन्याचा साठा नाही.
सोन्याबाबत इतिहासातील नोंदी…
पृथ्वीवर सापडलेल्या सर्वात जुन्या धातूंपैकी सोने हे एक आहे. सुमारे 5,000 वर्षांपूर्वी सोन्याचा शोध लागला, असे खोगलशास्त्रज्ञ सांगतात. सोने हे आर्थिक समृद्धीचे प्रतीकही आहे. एक काळ असा होता भारताला “गोल्डन बर्ड’ म्हटले जायचे, असे म्हणण्याची अनेक कारणे होती. इतिहासातील नोंदीनुसार इराणचा शासक नादीर शाह याने 1939 मध्ये दिल्लीवर हल्ला केला तेव्हा त्याने इतके सोने लुटले की तीन वर्षे तेथे कोणालाही कर भरावा लागला नाही. सम्राट शाहजहानने स्वतःसाठी एक सोन्याचे सिंहासनही बांधले, ज्याला “तख्त-ए-तौस’ असे म्हणतात. इंग्रजांनीही भारतातून भरपूर सोने लुटले.
- जागतिक सुवर्ण परिषदेच्या अहवालात नोंद
- अंगावर सोने मिरवणाऱ्यांमध्ये भारतीय आघाडीवर
- भारतातील महिलांकडे
- 21 हजार टन सोने