नगर – मराठा समाजाला आरक्षण तातडीने आरक्षण द्यावे, ओबीसी कोट्याला धक्का न लावता नवीन धोरण तयार करून हा आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवावा, या मागणीसाठी मराठा महासंघातर्फे नवी दिल्लीत 25 जुलै रोजी जतंरमंतर मैदानावर आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यातून हजारो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती मराठा महासंघाचे सरचिटणीस संभाजी दहातोंडे पाटील यांनी दिली.
दहातोंडे पाटील यांनी सांगितले की, मराठा समाजाला 2014 साली 16 टक्के आणि त्यानंतर 2019 मध्ये 12-13 टक्के आरक्षण देण्यात आले होते. दोन्ही वेळा 50 टक्केच्या वर मर्यादा वाढवून दिलेले आरक्षण कोर्टात टिकले नाही.त्यामुळे आता 50 टक्केच्या आत आरक्षण द्या किंवा घटना दुरुस्ती करा. सर्वाच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारने दाखल केलेली पुनर्याचिका देखील फेटाळली आहे. केंद्र सरकारच्या स्तरावर महाराष्ट्रातील मराठा समाज, हरियाणातील जाट समाज, राजस्तानचा राजपूत समाज, कर्नाटकांचा राज्यू समाज, मनियार समाज, पटेल समाज, काही अंशी कुर्मी समाज आणि इतर आरक्षणापासून आरक्षण वंचित समाजांना सुध्दा आरक्षणाचा फायदा मिळावा, हीच मराठा महासंघाची भूमिका आहे.
ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळण्यास विलंब लागणार असेल तर धोरणात बदल करा. मात्र आरक्षणातून वंचित असलेल्या मराठा समाजासह देशातील सर्व वंचित समाज घटकांना नोकरी, शिक्षण यामध्ये आरक्षण द्यावे, अशी अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी आहे. 50 टक्केच्या आत आरक्षण असले पाहिजे अशी जनभावना मराठा महासंघाची आहे. तरच ते सर्वाच्च न्यायालयात टिकेल किंवा घटना दुरुस्ती करावी. सततची आंदोलने, मोर्चे बंद याचा झालेला अतिवापर यामुळे आज मराठा समाजातील कायकर्ते आंदोलन करणार आहेत.
यात मागणीसाठी मराठा महासंघातर्फे नवी दिल्लीत 25 जुलै रोजी महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप यांच्यासह महासंघाचे राज्यस्तरावरील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते जंतरमंतर मैदानावर तीव्र आंदोलन केले जाणार आहे. राज्यातून हजारो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती मराठा महासंघाचे सरचिटणीस संभाजी दहातोंडे पाटील यांनी दिली.