माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांचा सरकारला इशारा
नवी दिल्ली : वित्त आयोगाच्या कार्यपध्दतीत बदल करायचे असतील तर राज्यांना विश्वासात घ्यावे लागेल, असे मत नाजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी व्यक्त केले.
वित्त आयोगाच्या संदर्भातील राष्ट्रीय परिसंवादात मनमोहनसिंग बोलत होते. ते म्हणाले, वित्त आयोगाच्या कामकाज धोरणात बदल करायचे असतील तर मुख्यमंत्र्यांच्या परिषदेची परवानगी घ्यावी. अन्यथा राज्याच्या उत्पन्नावर घाला घालण्याचा सरकारचा विचार आहे, असा समज निर्माण होऊन त्यातून विसंवाद आणि नवे वाद निर्माण होतील.
आरोग्य, शिक्षण, पर्यावरण रक्षण आणि अशा अन्य महत्वाच्या विषयांमध्ये सर्व राज्य सरकारना स्वारस्य असते. या मुद्यांवर राष्ट्रीय मत्यैक्य निर्माण झाले पाहिजे. अन्यथा वाद आणि असंतोष निर्माण होऊन त्याचा परिणाम त्याचा परिणाम देशाच्या संघराजात्मक एकतेवर होऊ शकेल, असा इशारा त्यांनी दिला.