वाल्हे- श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची वारी सुरू होण्यास 14 दिवस बाकी असताना रविवारी (दि.9) झालेल्या वळवाच्या पावसात वाल्हे पालखी तळावरील हायमास्ट दिवा कोसळला आहे. यामुळे पालखी तळ सुशोभीकरण कामातील निकृष्ट दर्जा उजेडात आला आहे. रविवारी झालेल्या वादळी पावसाने या ठिकाणी बसविण्यात आलेल्या 14 लाख 72 हजार किमतीच्या 6 हायमास्ट दिव्या पैकी एक दिवा जमीनदोस्त झाला. जर हा दिवा पालखी सोहळ्याच्या काळात कोसळला असता तर जीवितहानीसोबत मोठे नुकसान झाले असते, त्यामुळे पालखी तळावरील सर्वच कामाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी पुणे जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे यांनी केली आहे.