हैद्राबाद – भारतातील दाक्षिणात्य ज्यातील महिला पुरुषांच्या तुलनेत स्थूलपणाच्या समस्यांनी जास्त त्रस्त आहेत तामिळनाडू राज्यामध्ये महिलांमधील स्थूलत्वची समस्या अधिक तीव्र असून सर्वात कमी समस्या तेलंगणा राज्यामध्ये आहे हैदराबाद येथील कौन्सिल ऑफ सोशल डेव्हलपमेंट या संस्थेने नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणात हे निष्कर्ष समोर आले आहेत
दक्षिण भारतातील तेलंगणा आंध्रप्रदेश तामिळनाडू केरळ आणि कर्नाटक या 5 राज्यांमधील एकूण 120 जिल्ह्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले त्यासाठी 15 ते 49 या वयोगटातील महिलांचा अभ्यास करण्यात आला तामिळनाडूतील महिलांच्या स्थूलपणामध्ये साडेनऊ टक्के वाढ झाल्याचे या अभ्यासात लक्षात आले सर्वात कमी 2 टक्के वाढ तेलंगणा राज्यांमधील महिलांच्या स्थूलपणामध्ये झाली आहे कर्नाटक मधील महिलांबाबत 6.9 टक्के आणि केरळमध्ये 5.7 टक्के असे हे प्रमाण आहे
राष्ट्रीय पातळीचा विचार करता भारतातील 24 टक्के महिला सध्या स्थूलपणाच्या समस्येने ग्रस्त आहेत पुरुषांमध्ये हा आकडा 22 टक्के एवढाच आहे पुरुषांपेक्षा महिलांमध्ये स्थूलपणाची समस्या अधिक आहे या सर्वेक्षणामध्ये ग्रामीण आणि नागरी जीवनाचा अभ्यास केला असता ग्रामीण महिलांच्या तुलनेने शहरी भागातील महिलांमध्ये स्थूलपणाचे प्रमाण जास्त असल्याचेही लक्षात आले जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमावलीप्रमाणे ज्या व्यक्तीचा बॉडी मास इंडेक्स 25 पेक्षा जास्त आहे त्याला ओव्हरवेट मानण्यात येते तर ज्या व्यक्तीचा बॉडी मास इंडेक्स 30 पेक्षा जास्त आहे त्याला अतिस्थूल मानले जाते स्थूल व्यक्तींमध्ये अनेक आजारांचा सहजपणे शिरकाव होत असल्याने महिलांनी आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे या अहवालात सुचविण्यात आले आहे