कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त महिलांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज पुणे बेंगलोर महामार्ग रोखून तिथेच संसार मांडला. ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुराने अनेकांचे संसार देशोधडीला लागले.
मात्र सरकारने अद्याप कोणाहीती मदत केली नसल्याचा आरोप या महिलांनी केला आहे. शिवाय अनेक महिलांनी मायक्रो फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले असून महापूराच्या फटक्याने त्यांना हप्ते फेडणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे महिलांना सुद्धा शेतकऱ्यांच्या धर्तीवर कर्जमाफी द्यावी अशी मागणी या महिलांनी करत आक्रमक आंदोलन केल. दरम्यान, यावेळी पोलीस आणि महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात झटापट झाली.