पुणे : रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची घोषणा राज्यशासनाने केली असली तरी पुण्यातील अनेक रिक्षाचालकांवर काही दिवसांपूर्वी गुन्हे दाखल करण्यात आले असून ते तातडीनं मागे घ्यावेत अशी मागणी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे यांनी विधानसभेत केली.
विधासभेतील चर्चेत बोलताना तुपे म्हणाले की, रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करणार अशी घोषणा सरकारने केली. ही चांगली बाब आहे पण काही दिवसांपूर्वी पुण्यातील रिक्षाचालकांनी बाईक टॅक्सी विरोधात आंदोलन केले होते. ते गुन्हे आधी मागे घ्यावेत.
‘त्या’ आरक्षणाबाबत 17 जुलैपासून सर्वोच्च न्यायालयात नियमित सुनावणी – मंत्री गुलाबराव पाटील
कल्याणकारी मंडळ स्थापन करतांना आत्ता रिक्षा चालकांची त्यांच्या कुटुंबीयांची जी स्थिती आहे ती सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. यासाठी त्यांच्यावरील गुन्हे तातडीने मागे घेण्याची मागणी केली.