India vs Australia T20 Series : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने भारताने जिंकले असून आज तिसरा टी-20 सामना गुवाहाटी येथे खेळवला जाणार आहे, मात्र या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने मोठा निर्णय घेतला आहे.
ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात बदल केले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक विजेत्या ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक संघातील सहा सदस्य T20 मालिकेच्या मध्येच मायदेशी परतत आहेत. ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, जोश इंग्लिस आणि सीन अॅबॉट आज (28 नोव्हेंबर) गुवाहाटीतील तिसऱ्या टी-20 सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाला परततील. स्टीव्ह स्मिथसह कांगारू फिरकीपटू अॅडम झाम्पा यापूर्वीच मायदेशी परतला आहे. त्यामुळे नवीन संघात कोणत्या खेळाडूंचा समावेश असेल ते पाहूया…
ऑस्ट्रेलियाचा नवीन T20 संघ…
मैथ्यू वेड (कर्णधार आणि विकेटकीपर), जेसन बेहरेनडोर्फ, टिम डेविड, बेन ड्वारशुइस, नाथन एलिस, क्रिस ग्रीन, आरोन हार्डी, ट्रैविस हेड, बेन मैकडरमोट, जोश फिलिप, तनवीर सांघा, मैट शॉर्ट, केन रिचर्डसन.
ऑस्ट्रेलियाचा जूना T20 संघ…
मैथ्यू शॉर्ट, स्टीवन स्मिथ, जोश इंग्लिस, आरोन हार्डी, मार्कस स्टोइनिस, टिम डेविड, मैथ्यू वेड (कर्णधार आणि विकेटकीपर), सीन एबॉट, नाथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, तनवीर संघा ट्रैविस हेड, ग्लेन मैक्सवेल, एडम ज़म्पा, केन रिचर्डसन.
विश्वचषक विजेते 6 खेळाडू परतणार ऑस्ट्रेलियाला…
भारताविरुद्ध टी-20 मालिका खेळण्यासाठी आलेल्या जुन्या ऑस्ट्रेलियन संघातील ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, जोश इंग्लिस आणि सीन अॅबॉट आज मायदेशी परततील. त्यांच्या जागी आता ऑस्ट्रेलियन संघात जोश फिलिप, बेन मॅकडरमॉट, बेन ड्वारशुइस, ख्रिस ग्रीन यांचा समावेश होणार आहे. आज गुवाहाटी येथे होणार्या तिसर्या T20 सामन्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ आगामी दोन टी-20 सामन्यांसाठी नवीन संघातून आपला प्लेइंग इलेव्हन निवडणार आहे. या मालिकेतील तिसरा सामना आज गुवाहाटी येथे खेळवला जाणार आहे, जो या मालिकेच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियासाठी करा किंवा मरो असा सामना आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील उर्वरित दोन टी-20 सामने रायपूर आणि बंगळुरू येथे खेळवले जातील.
JUST IN: Wholesale changes for Australia’s T20 squad with six World Cup winners on their way home from India | #INDvAUS
— cricket.com.au (@cricketcomau) November 28, 2023
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणार्या या T20 मालिकेबद्दल बोलायचे झाले तर, या पाच सामन्यांच्या मालिकेत आतापर्यंत 2 सामने खेळले गेले आहेत आणि त्या दोन्हीमध्ये भारताने विजय मिळवला आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 209 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 2 गडी राखून सामना जिंकला होता. त्याच वेळी, दुसऱ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 236 धावांचे मोठे लक्ष्य दिले होते, ज्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया केवळ 191 धावा करू शकला आणि दुसरा सामना 44 धावांनी गमावला.