Gopichand Padalkar : राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. त्यात मराठा समाज, ओबीसी आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाने सरकारच्या नाकी नऊ आणल्याचे दिसत आहे. भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना थेट इशारा दिला आहे.
यावेळी भाजप आमदार गोपीचंद पडळवकर चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी मराठा समाजाचे खरे शत्रू कोण आहे? याचे उत्तर दिले. हे उत्तर स्वत: दिले नाही. त्यांनी जनतेतून ते उत्तर घेतले. जनतेने मराठा समाजाचे खरे शत्रू शरद पवार असल्याचे वक्तव्य केले. आम्ही भुजबळ साहेबांच्या पाठीशी सगळे आहोत, असे त्यांनी म्हटले. ‘प्रस्थापिताना देऊ उत्तर, कारण ओबीसी शंभरात सत्तर’, असा नवीन नारा गोपीचंद पडळकर यांनी दिला.
दरम्यान “मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या महायुतीच्या सरकारचा नेतृत्त्वात धनगर आरक्षण अंमलबाजवणी होईल, ही आशा सामान्य धनगरांना आहे. मात्र, त्यांच्याकडूनही निराशा पदरी पडत आहे. धनगर समाजाच्या उद्धारासाठी सुरु असलेल्या योजना बंद आहेत. त्या आमच्या आठही मागण्यांची अंमलबाजवणीची तात्काळ गरज आहे, असे त्यांनी म्हटले.
तसेच “समित्या गठित करून धनगर समाजाच्या पदरात यातून काहीही पडणार नाही. ही भावना सामान्य धनगरांच्या मनात निर्माण होते आहे.आपण वेळीत योग्य पावलं उचलावीत. धनगर आरक्षणाचा मुद्दा निकालात काढावा. अन्यथा धगनर समाजाच्या संविधानिक प्रतिक्रियेला आणि आंदोलनाच्या रोषाला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी. हा इशारा राज्यातील तमाम 5 कोटी धनगर समाजाच्यावतीने मी तुम्हाला देतो आहे”, असे गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांना म्हटले आहे.