प्रयाग राज – येथे आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळाव्यात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलींच्या विवाहाचे वय 18 वरून 21 इतके करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले आहे. ते म्हणाले की मुलींना शिक्षणाची अधिक संधी मिळावी म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे. ज्या राजकीय पक्षांना या निर्णयावर आक्षेप आहे त्यांच्याकडे या मुलींचे लक्ष आहे अशी टिप्पणीही मोदींनी यावेळी केली.
या मेळाव्यात पंतप्रधानांनी महिला बचत गटासाठी एक हजार कोटी रूपयांची मदतही दिली. त्या संबंधात प्रतिक्रीया देताना कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे की उत्तरप्रदेशातील महिला शक्तीने मिळवलेला हा मोठा विजय आहे. त्यांनी पंतप्रधानांनाही आपल्या पुढे गुडघे टेकण भाग पाडले आहे. ही मदत आजच का दिली?
गेल्या संपुर्ण पाच वर्षात त्यांना ही मदत का देता आली नाही? असे प्रश्न उपस्थित करून प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे की, आज उत्तरप्रदेशातील महिला जागरूक आणि एकजुट झाल्याने भाजप सरकारला त्यांच्या पुढे झुकावे लागले आहे आणि त्यांना ही मदत द्यावी लागली आहे. कॉंग्रेसने उत्तरप्रदेशात लडकी हू लड सकती हुँ ही मोहीम राबवली त्यामुळे महिला संघटीत व जागरूक झाल्या आहेत असे त्या म्हणाल्या.