बस्ती – कृषी कायदे छापण्यासाठी जी काळी शाई वापरली गेली आहे त्या खेरीज या कायद्यात काळे काय होते असा उपरोधिक सवाल केंद्रीय मंत्री व माजी लष्करप्रमुख व्ही. के सिंह यांनी केला आहे.
हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच होते त्यात काळे असे काहीही नव्हते असे त्यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. भारतीय जनता पक्षानेच शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोग लागू केला आहे हेही शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे अशी सुचनाहीं सिंह यांनी केली.
ते म्हणाले की शेतकऱ्यांच्या संघटनांमध्ये वर्चस्ववादाची लढाई सुरू असते. त्यामुळे हे नेते छोट्या शेतकऱ्यांच्या हिताविषयी विचार करीत नाहीत. उत्तरप्रदेशातील निवडणुका लक्षात घेऊन कायदे मागे घेतले गेले आहेत हा आरोपही त्यांनी फेटाळून लावला. ते म्हणाले की, उत्तप्रदेशात भाजपला लक्षणीय विजय मिळेल.