पुणे – अर्थसंकल्पाबाबत बोलताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कृषी क्षेत्राशी संबंधित सर्वांच्याच निराशाजनक प्रतिक्रिया दिली आहे. ते पत्रकरांशी बोलतांना म्हणाले,…
‘मोदी सरकारचा हा सातवा अर्थ संकल्प ‘
सामान्य माणूस आणि नोकरदार यांच्या पदरी कररचनेत काहीही बदल न केल्याने निराशाच आलेली आहे. वास्तविक त्यांना दिलासा मिळेल असे वाटले होते, प्रत्यक्षात कररचना जैसे थे असल्याने अर्थसंकल्पाने सामान्य माणसाला फार काही दिलेले नाही
ते पुढे म्हणाले,’हे बजेट गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारं असलं पाहिजे, अधिक हाताला काम देणारं असलं पाहिजे, सर्वसामान्य माणसाला ज्या दैनंदिन जीवनात वस्तू लागतात त्याच्या किमती नियंत्रण ठेवून महागाईला आटोक्यात आणण्यासाठी बजेट मध्ये तरतूद असायला पाहिजे परंतु याची पूर्तता बजेटमध्ये झालेली दिसत नाही’
‘शरद पवार ऑन निवडणूक 5 राज्य बजेट ‘
-निवडणूकीच्या दृष्टीने बजेटमध्ये काही करायचा प्रयत्न केलाय पण त्याचा काही फायदा होईल असं वाटत नाही
-सर्वात महत्त्वाची निवडणूक ही उत्तर प्रदेश ची आहे..
-उत्तरप्रदेशात शेती हा महत्त्वाचा घटक आहे..
-शेती क्षेत्रातला जो वर्ग आहे तो नाराज झाला आहे बजेट चा परिणाम निवडणूकीवर होईल अस वाटत नाही..
-निवडणुकांच्या संदर्भात बोलणं आता उचित होणार नाही नॉमिनेशन ची प्रक्रिया सुरू आहे..
-प्रत्येक राज्याची स्थिती वेगळी आहे up मध्ये प्रामुख्याने समाजवादी पक्षा सोबत शेतकरी वर्ग संघटित झालेला दिसतोय..
-3/4 दिल्लीच्या सीमेवर वर्षे भर शेतकरी आंदोलनाला बसले होते कायदे मागे घेतले व काही आश्वासन दिल पण त्यांच्या मागण्यांची पूर्तता झाली नाही. त्याची किंमत सरकारला मोजावी लागेल याची मला खात्री आहे..
-बाकी राज्यामध्ये मी अजून गेलो नाही तिकडे मला जावं लागेल..
निवडणूकीच्या दृष्टीने जर हे बजेट उपयुक्त पडेल अस वाटत असेल तर ते उपयुक्त ठरणार नाही..