मंचर, (प्रतिनिधी)- विश्वकर्मा योजना ग्रामीण कारागिरांना नवसंजीवनी देणारी आहे. या योजनेचा लाभ 18 पारंपरिक कारागिरांना मिळू शकतो. त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने ग्रामपंचायत, नगरपंचायत किंवा नागरी सुविधा केंद्रामध्ये नाव नोंदणी करा. त्यानंतर त्यांना मोफत पाच दिवस प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी दिली.
नारी शक्ती वंदन समारोप कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमधील बारासात येथून संबोधित केले. त्यानिमित्ताने कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह मंचर येथे नारीशक्ती वंदन हा कार्यक्रम भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, आंबेगाव तालुका निवडणूक प्रमुख जयश्री पलांडे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष पूनम चौधरी, भाजप नेते संजय थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली लाइव प्रक्षेपणाद्वारे झाला.
नारी शक्ती वंदन कार्यक्रम संयोजिका रुपाली घोलप, तालुकाध्यक्ष महिला मोर्चा ज्योती काळे, स्नेहल चासकर, प्रमिला निराळे, सोनाली काळे, अर्चना बुट्टे, शोभा थोरात यावेळी भानुदास नाना काळे, जयसिंग एरंडे, रवींद्रकाका त्रिवेदी, उत्तम राक्षे, कालिदास गांजाळे, गणेश थोरात, भरत काळे, गणेश काळे, बाळासाहेब कोकणे आदी मान्यवर उपस्थित होते.