नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. निर्मला सीतारामन यांचा हा चौथा तर मोदी सरकारचा १० वा अर्थसंकल्प आहे. दरम्यान यावेळीदेखील अर्थमंत्री पेपरविना अर्थसंकल्प मांडत आहेत. दरम्यान, या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात येत आहेत. त्यात करोना काळात विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन त्यांच्यासाठी देखील महत्चाची घोषणा करण्यात आली आहे.
‘PM eVIDYA’ मधील ‘वन क्लास वन टीव्ही चॅनेल’ योजना वाढवण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी पहिली ते बारावीसाठी चॅनेल सुरु करणार असून त्याची संख्या १२ वरुन २०० पर्यंत वाढवण्यात येईल. प्रादेशिक भाषांमध्ये हे चॅनेल काम करतील. यासाठी इंटरनेट रेडिओ आणि डिजीटल साधनांचा वापर करण्यात येईल असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे.
डिजीटल विद्यापीठ सुरु करणार असून डिजीटल विद्यापीठ देशातील प्रादेशिक भाषांमध्ये सुरु होणार. डिजीटल विद्यापीठांशी देशातील नामांकित विद्यापीठांचे करार असणार असेही त्यांनी सांगितले.