जीनिव्हा: संयुक्त राष्ट्र महासचिव एंटोनियो ग्रुटेरस यांनी लडाख क्षेत्रात एलओसी ठिकाणी भारत-चीन सैन्यांमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे चिंता व्यक्त केली आहे. दोन्ही देशांनी संयम बाळगावा असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
महासचिवांची सहाय्यक प्रवक्ता एरी कानेको यांनी म्हटले आहे की, “आम्ही भारत आणि चीन दरम्यान एलआयसीवर हिंसा आणि मृत्यू झालेल्या बातमीमुळे चिंताग्रत आहोत. दोन्ही देशांनी संयम राखवा असे आम्हाला वाटते’.
गेले पाच आठवडे चीन-भारत सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. गलवान खोऱ्यात तणाव कमी करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच सोमवारी रात्री हा हिंसाचार झाला. त्यात दोन्ही बाजूची जीवितहानी झाली. त्यात भारतीय लष्कराचे 20 जवान शहीद झाले. चीनचेही 50 सैनिक मारल्याचे बोलले जात आहे.