Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेयांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धन्यवाद दिले. मराठा समाजाला जाहीर झालेल्या आरक्षणानंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षण विधेयकाच्या चर्चेसाठी विधीमंडळाच्या विधानपरिषदेच्या सभागृहात हजेरी लावली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांचे धन्यवाद मानले आहेत. ( Uddhav Thackeray )
उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष फुटीनंतर आज पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडून गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ शिंदे हे कायदेशीर मुख्यमंत्री नाहीत, अशी टीका केली जात होती. ( Eknath Shinde )
आज या अधिवेशनासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्व आमदार उपस्थित आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक सादर केलं आणि हे विधेयक एकमताने मंजूर झाले.
दरम्यान, सभागृहातून बाहेर आल्यानंतर माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘मला खात्री आहे ज्या पद्धतीने अभ्यास करुन मराठा आरक्षणाचा मसुदा मांडण्यात आला आणि हे विधेयक मंजूर झाला, याचा अर्थ असा आहे की, ( Eknath Shinde )
कायद्याचे सर्व निकषांवर हे आरक्षण टिकेल, अशी आशा आहे. तशी आमची सर्वांची प्रार्थना आहे. सभागृहात याबाबत समजून सांगण्याची गरज नव्हती. कारण सभागृहात दोन्ही वेळेला एकमताने मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे’. असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘मला राजकारणाबाबत जास्त काही बोलायचं नाही. कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिलंय, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. एकच प्रार्थना करतो की, पूर्वीचे सर्व अनुभव लक्षात घेऊन हे आरक्षण कायद्याच्या सर्व पातळीवर टिकेल. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळेल, अशी मी आशा बाळगतो’.
ते पुढ़े म्हणाले, “शिक्षण आणि नोकरीत आरक्षण दिले आहे. किती जणांना नोकऱ्या मिळतात हे बघावं लागेल. दोन मते असती तर आम्ही एकमत दिले नसते. मुख्यमंत्री काय आहेत कसे आहेत त्यांचा इतिहास सर्वाना माहिती आहे. जनतेचा विश्वास मुख्यमंत्री यांच्यावर नाही, असा खोचक टोला देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला.