श्रीगोंदा -श्रीगोंदा शहराला घोड धरणावरून पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटल्याने शहराला शुक्रवारी व शनिवारी पाणी मिळणार नाही. ऐन उन्हाळ्यात दोन दिवसांसाठी पाणी असून देखील टंचाई निर्माण झाली आहे.
शहराला घोड धरणावरून पाणीपुरवठा करण्यात येतो. यासाठी जमिनीखालून पाईपलाईन श्रीगोंदा शहरापर्यंत आणण्यात आली आहे.
सुमारे 50 कोटींची ही नळयोजना आहे. म्हतारपिंप्री (ता. श्रीगोंदा) येथे एक शेतकरी जेसीबीद्वारे काम करत असताना जेसीबीच्या धक्क्याने या मुख्य पाईपलाईनला भगदाड पडले. परिणाम धरणात पाणी असून देखील श्रीगोंदा शहरापर्यंत ते पोहचू शकत नाही. शुक्रवारी व शनिवारी शहराला पाणी मिळणार नाही.
पाईप दुरुस्त झाल्यानंतर सुरळीत पाणीपुरवठा सुरू होईल. पाईपलाईन फोडणाऱ्या शेतकऱ्यांवर नगरपालिका काय कारवाई करते. याकडे सर्वांच लक्ष आहे. पाणी असून देखील ऐन उन्हाळ्यात शहरावर पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे.