नवी दिल्ली – करोनाची लाट आटोक्यात आणण्यासाठी ज्या उपाययोजना लागू केल्या जातील, त्याद्वारे जनजीवनावर परिणाम होऊ देऊ नये अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. करोना रुग्ण वाढत असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर पंतप्रधानांनी संवाद साधला.
यावेळी आयोजित केलेल्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ५ जानेवारीच्या पंजाब दौऱ्यादरम्यान सुरक्षेमधील त्रुटींवरुन वाद निर्माण झाल्याच्या प्रकाणावर खेद व्यक्त केला.
मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी म्हणाले,’“पंतप्रधानजी, तुम्ही आमच्यासाठी आदरणीय आहात. तुमच्या पंजाब दौऱ्यादरम्यान जे काही झालं त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो,”
ते पुढे म्हणाले “तुम सलामत रहो कयामत तक और खुदा करे कि कयामत ना हो,” अशा ओळी म्हणत चन्नी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.”