औरंगाबाद – त्रिपुरातील घटनांच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरातही काही हिंसक प्रकार घडले होते. तथापि आता तेथील स्थिती पुर्ण नियंत्रणात आली असून शहरातील सामान्य जनजीवन पुर्ववत झाले आहे.
शहरातील हिंसक घटनांबद्दल आत्तापर्यंत 35 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. शुक्रवारी काही समाजकंटकांनी शहरात दगडफेक केली होती. पोलिसांच्या गाडीवरही दगडफेक करण्यात आली. त्यात दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले होते.
वजिराबाद, देगलुर नाका आदि ठिकाणी झालेल्या हिंसक प्रकारात मालमत्तांचे सुमारे एक लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.
राज्यात अमरावती, मालेगाव, वाशिम, यवतमाळ आदि शहरांत शुक्रवारी जातीय हिंसांचाराच्या घटना घडल्या. त्यात अमरावतीतील परिस्थिती अधिक बिकट बनली होती. त्यामुळे तेथे संचारबंदीची उपाययोजना करावी लागली आहे.