नवी दिल्ली – काश्मिरी पंडितांच्या संरक्षणाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांना चित्रपटाच्या प्रचारातूनच सवड मिळत नसल्याची टीका कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. भारतीय जनता पार्टीने पंडितांचा वापर केवळ सत्तेच्या शिडीसाठी केला असेही त्यांनी म्हटले आहे.
काश्मिरमध्ये आज एका बॅंक कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राहुल यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. बॅंक व्यवस्थापक, शिक्षक आणि अनेक निरपराध लोक मारले जात आहेत.
काश्मीरी पंडितांचे पलायन सुरू आहे. मात्र त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ज्यांच्याकडे आहेत ते लोक चित्रपटाच्या प्रचारात व्यस्त आहेत. काश्मीरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पंतप्रधानांनी तातडीने पाउले उचलावीत असेही त्यांनी यावेळी म्हटले.