मुंबई – राज्यात गुढी पाडव्याच्या दिवसापासून मशिदींवर वाजणारे भोंगे आणि हनुमान चालीसा याच्यावरून चांगलेच राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांच्या भूमिकेचा पुनरुच्चार करत राज्य सरकारला सर्व मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे.
यातच, राज ठाकरे यांची आज औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. ते आज काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले असून या सर्व मुद्यांवर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकरांशी बोलतांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. सुळे म्हणाल्या,’राज ठाकरे यांना मी औरंगाबादेतील सभेसाठी शुभेच्छा देते. त्या पुढे म्हणाल्या.अल्टिमेटम हा शब्द ज्या राज्यात लहानाची मोठी झाली तिथल्या संस्कृतीत बसत नाही.’
मला चांगल्याने आठवते,’यशवंतराव चव्हाण यांनी हा शब्दच कधी वापरला नव्हता. त्यामुळे मला फारसा त्या शब्दाचा अर्थ समजत नाही. माझ्या मते, या राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांचं अतिशय सक्षम असं सरकार आहे, तसेच एक कार्यक्षम असे गृहमंत्री देखील आहेत. जे चांगलं काम करतय. हे केवळ मीच म्हणत नाही तर केंद्र सरकारची आकडेवारी देखील हेच सांगते आहे.