नवी दिल्ली – जी-20 शिखर परिषद सध्या राजधानी दिल्लीत सुरू आहे. या शिखर परिषदेत जगभरातील देशांचे राष्ट्राध्यक्ष सहभागी झाले आहे. या सर्व पाहुण्यांच्या आगमानने दिल्ली नव्या नवरीसारखी सजविण्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला असून, त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहे.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी जी-20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर सरकार झोपड्या लपवल्याचा किंवा पाडल्याचा आरोप केला आहे. एवढेच नव्हे तर या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर भटक्या प्राण्यांना पकडून डांबले जात असल्याचा आरोप लावत ते म्हणाले की, भारताचे वास्तव पाहुण्यांपासून लपवण्याची गरज नाही, असे म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी ट्विट केले की, केंद्र सरकार आपल्या देशातील गरिबी आणि मुक्या भटक्या प्राण्यांना विदेशी पाहुण्यांपासून लपवत आहेत. पाहुण्यांपासून भारताचे वास्तव लपवण्याची गरज नाही. यासोबतच कॉंग्रेस पक्षाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात झोपडपट्ट्या हिरव्या चादरीने झाकलेल्या दिसत आहेत.