भादोही: एका महिलेने आपल्या पाच मुलांना गंगा नदीत फेकल्याचा आरोप करण्यात आला आहे. पतीशी झालेल्या भांडणाच्या रागात तिने मुलांना फेकल्याचं सांगण्यात येत आहे. नदीत फेकलेल्या मुलांपैकी एका 11 वर्षांच्या मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
जहांगिराबादमधील गंगेच्या घाटावर हा प्रकार घडला. महिलेने तिच्या पाच मुलांसह गंगा नदीत उडी मारल्याची प्राथमिक माहिती आम्हाला मिळाली. पण नंतर तपास केल्यावर महिलेने आपल्या पाच मुलांना गंगा नदीत फेकल्याचं समोर आलं आहे. चौकशीत या महिलेने तशी कबुलीही दिलीय, अशी माहिती पोलिसांनी दिली. गंगा नदीत इतर मुलांचा शोध घेण्यात आहे, असं पोलीस अधीक्षक रामबदन सिंह यांनी सांगितलं.