एस. एस. राजामौली एक चित्रपट करतोय. त्याचे तमिळ आणि तेलगू या दोन भाषांतले डबिंग पूर्ण झाले आहे. त्यानंतर अन्य भाषांतही डबिंग केले जाणार आहे. चित्रपटाच्या केवळ दोन गाण्यांचे शूटिंग आता राहिले आहे. ते झाल्यावर पोस्ट प्रोडक्शन अर्थात निर्मिती पश्चात केल्या जाणाऱ्या कामांना सुरुवात केली जाणार आहे.
हा चित्रपट दोन थोर स्वातंत्र्यसैनिकांच्या जीवनावर आधारित आहे. मात्र, सिनेमा म्हटला की थोडी मोकळीक अर्थात लिबर्टी घेतली जाते. तशी ती या चित्रपटाच्या बाबतीतही घेण्यात आली आहे. या चित्रपटाची गेल्या अनेक महिन्यांपासून बरीच चर्चा आहे. आता शूटिंग जवळपास पूर्ण झाले असल्यामुळे चाहते अत्यंत आतुरतेने चित्रपटाची वाट पाहात आहेत.
आता एखाद्या चित्रपटाबद्दल एवढे अपडेट काय द्यायचे? त्यात असे काय विशेष आहे, असा सवाल कोणालाही पडू शकतो. तो चुकीचा नाही. पण या चित्रपटाची स्पेशालिटी ही आहे की, राजामौली त्याचा दिग्दर्शक आहे. दुसरी आणि सगळ्यांत महत्त्वाची बाब म्हणजे साउथचे व विशेषत: तेलगू चित्रपटसृष्टीचे सगळ्यांत मोठे कलाकार अर्थात महासुपरस्टार या चित्रपटांत त्या दोन स्वातंत्र्यसैनिकांची भूमिका साकारत आहेत.
त्या सुपरस्टार्सची नावे आहेत- रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर ही त्यांची नावे. या दोघांचे एक पोस्टरही इंटरनेटवर जोरात झळकते आहे. त्यामुळे चित्रपटाविषयीची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील अजय देवगण आणि आलिया भट्ट हे दोन कलाकारही या चित्रपटात आहेत. हा चित्रपट बिगबजेट आहे. प्रेक्षकांना त्या कालखंडाचा प्रत्यक्ष फिल यावा यासाठी हैदराबाद येथे भव्य सेटस् उभारण्यात आले आहेत. आता आरआरआर नक्की काय कमाल करतो ते पाहावे लागेल.