भाटघर- भोर, वेल्ह्याला विविध समस्यांनी ग्रासले आहे. या दोन्ही तालुक्यांत रस्त्यांची फार मोठी दुर्दशा असून, बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे. या समस्यांपेक्षाही लोकप्रतिनिधी सर्वात मोठी समस्या असल्याची टीका शिवसेनेचे उमेदवार कुलदीप कोंडे यांनी केली.
भुतोंडे खोऱ्यातील विविध गावांत कुलदीप कोंडे यांनी प्रचार केला. कोंडे म्हणाले की, भोर, वेल्ह्याला मागे ठेवण्याचे काम थोपटे यांनी केले. भोरच्या चारही दिशेला एमआयडीसी आहे. परंतु, भोरमध्ये एमआयडीसी का आली नाही? असा प्रश्न विचारत कोंडी यांनी भोर, वेल्ह्याचा विकास करायचा असेल तर परिवर्तन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.