जळोची – अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून आहिल्यानगर करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्याचे आपण स्वागत करतो; मात्र श्रेय कुणा एकट्याचे नसून सर्वांनी त्यासाठी प्रयत्न केल्याशिवाय बारामती येथे सुरू करण्यात येणाऱ्या मेडिकल कॉलेजचे नाव देखील पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर करण्यात आले, त्यामुळे शासनाचे आभार आणि अजित पवार यांचे अभिनंदन कारण त्यांच्या प्रयत्नांतून हे शक्य झाले आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिली आहे.
बारामती येथे माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे. यावेळी अनेक विषयांवर त्यांनी चर्चा केली आहे. रोहित पवार म्हणले की, अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर केल्याचा निर्णय घेतल्याबद्दल स्वागतच पण नगर जिल्ह्यात देखील मेडिकल कॉलेजचे उभारणी करण्याची घोषणा करून त्याला देखील अहिल्यादेवींचे नाव देण्याची घोषणा त्यांनी करायला हवी होती. कारण अहिल्यादेवी यांचा जन्म नगर जिल्ह्यात झाला आहे.
चौंडी गावांसाठी कोणतीही घोषणा झालेली नसल्याची खंत देखील त्यांनी बोलून दाखवली. या कार्यक्रमात पालकमंत्र्यांना देखील बोलून देणे अपेक्षित होते, त्यांचे मत देखील जाणून घेणे गरजेचे होते; मात्र वेळे आभावी ते शक्य झाले नसल्याचे देखील पवार म्हणाले आहेत.