बिजवाडी : उजनीच्या भिमापात्रात परवा संध्याकाळी वाऱ्याने बोट पलटी होऊन अपघात झाला होता. या अपघातात सहा जण बुडन बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. परवा संध्याकाळपासून या बुडालेल्या लोकांचा शोध घेण्याची मोहीम सुरू होती. ती तब्बल ३६ तासानंतर थांबली. आज सकाळी सहा मृतदेह पाण्यावरती तरंगताना सापडून आले.
सोलापूर जिल्ह्यातील कुगाव येथून इंदापूर तालुक्यातील कळाशी येथे सायंकाळच्या सुमारास निघालेली प्रवासी बोट अचानक वादळीवाऱ्यात सापडली आणि या वादळी वाऱ्यात ही बोट पलटी झाली. यामध्ये दोन लहान मुलांसह सहा जण बेपत्ता झाले होते. यातील एक प्रवासी पाण्यातून पोहत काळाशीच्या तीरावरती येण्यास यशस्वी झाला होता. या बाबत देव तारी त्याला कोण मारी असंच म्हणावे लागेल.
या घटनेमध्ये सोलापूर पोलिसात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक राहुल डोंगरे हे पोहून बाहेर आल्याने ते बचावले. या घडलेल्या अपघाताने संपूर्ण राज्यभर हळूहळू व्यक्ती झाली होती. घटना घडल्यापासून लगेचच बचाव कार्याला सुरुवाती झाली होती. मात्र पहिल्या दिवशी अंधार असल्यामुळे शोध घेण्यास अडचणी येत होत्या. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच एनडीआरएफ च्या टीमने तपास कार्याला सुरुवात करून, दुसऱ्या दिवशी एक बोट आणि मोटरसायकल काढण्यात यश मिळवले. मात्र एकही मृतदेह दुसऱ्या दिवशी हाती लागला नाही. साधारण साडेचार ते पाचच्या दरम्यान पुन्हा वादळी वारा सुरू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा तपास कार्य थांबले होते. तिसऱ्या दिवशी सकाळी मृतदेह उजनीच्या पाण्यावरती तरंगताना दिसून आले.
या अपघातानंतर करमाळा आणि इंदापूर तालुक्यातील काळाशी च्या उजनी पात्राच्या दोन्हीही बाजूला मृतांचे नातेवाईक बसले होते. मृतदेह पाण्यावरती तरंगताना पाहून दोन्हीही बाजूच्या नातेवाईकांचा संयमाचा बांध फुटला आणि एकच आक्रोश होऊ लागला. घडलेली घटना ही अत्यंत वेदनादायी होऊन गेली. त्यामुळे दोन्हीही गावात दुःखाची छाया दिसून आली. या अपघातात दोन तरुण मुलं आणि दोन लहान बालक यांचा मृत्यू झाला ही घटना परिसरातील लोकांना वेदना देऊन गेली. तर करमाळा तालुक्यातील झरे येथील जाधव कुटुंब हे या पाण्यामध्ये सर्वच्या सर्व मृत झाल्याने नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. सापडलेले मृतदेह हे सर्व करमाळा तालुक्यातील असल्याने इंदापूर तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर प्रशासनाच्या ताब्यात दिले.