Ranbir Kapoor : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) अॅनिमल चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 886 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. एकीकडे हा चित्रपट सुपरहीट होत असताना प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी ‘ॲनिमल’ चित्रपटावर टीका केली. जावेद अख्तर यांनीही ‘ॲनिमल’चे यश धोकादायक असल्याचे म्हटले आहे. यावर आता ‘ॲनिमल’ सिनेमाच्या टीमने सडेतोड उत्तर दिले आहे.
‘अॅनिमल’च्या टीमने जावेद अख्तर यांना प्रत्युत्तर देत म्हंटले की, ‘जर तुमच्या क्षमतेचा लेखक प्रियकराचा (झोया आणि रणविजय यांच्यातील) विश्वासघात आणि फसवणूक समजू शकत नसेल, तर तुमची सर्व कला खोटी आहे. जेव्हा एखादा माणूस प्रेमात स्त्रीला फसवतो आणि जेव्हा ती एखाद्या पुरुषाला तिचे बूट चाटायला सांगते तेव्हा तुम्ही लोक त्याला स्त्रीवाद म्हणत आनंद साजरा करता. प्रेमाला लैंगिक राजकारणापासून मुक्त होऊ द्या. त्यांना फक्त प्रेमी म्हणूया.”
Writer of your calibre cannot understand the betrayal of a lover (Between Zoya & Ranvijay) then all your art form is big FALSE 🙃 & If a woman (betrayed and fooled by a man in the name of love) would have said “lick my shoe” then you guys would have celebrated it by calling it…
— Animal The Film (@AnimalTheFilm) January 7, 2024
काय म्हणाले होते जावेद अख्तर?
औरंगाबाद येथील अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चित्रपटांच्या सध्यस्थितीबद्दल चिंता व्यक्त ‘अॅनिमल’बाबत जावेद अख्तर म्हणाले होते की, ‘माझा विश्वास आहे की आज तरुण चित्रपट निर्मात्यांसाठी त्यांना कोणत्या प्रकारची पात्रे तयार करायची आहेत. ज्याचे समाज कौतुक करेल याची चाचणी घेण्याची वेळ आहे. उदाहरणार्थ जर एखादा चित्रपट असेल ज्यामध्ये एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीला त्याचे बूट चाटण्यास सांगितले किंवा जर एखाद्या पुरुषाने स्त्रीला थोबाडीत मारणे ठीक आहे असे म्हटले आणि चित्रपट सुपर डुपर हिट झाला तर ते खूप धोकादायक आहे.’
दरम्यान, संदीप वंगा रेड्डी यांच्या ‘अॅनिमल’ चित्रपटात रणबीर कपूरने तृप्ती डिमरीला प्रेम सिद्ध करण्यासाठी बूट चाटण्यास सांगितले होते. तर शाहिद कपूरने ‘कबीर सिंह’ चित्रपटातील कियारा अडवाणीला थोबाडीत मारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शनही संदीप वंगा रेड्डी यांनी केले होते आणि दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले होते. यावरून जावेद अख्तर यांनी चिंता व्यक्त केली होती.