मुंबई – राज्यात दिवसेंदिवस करोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट होत असल्याचे दिसून येत आहे. राज्यात सोमवारी 686 नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 912 रुग्ण करोनामुक्त झाले आहे.
राज्यात आतापर्यंत 64 लाख 68 हजार 791 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.64 टक्क्यांवर पोहोचले आहे.
राज्यात आज 19 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 11 हजार 943 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 99, 859 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1016 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6,40,52,219 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
दरम्यान, मुंबईत लसीकरणाने ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. मुंबईत करोना लसीच्या पहिल्या डोसचे 100 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. मुंबईत आतापर्यंत 92 लाख 36 हजार 500 नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे.
यामध्ये मुंबईतील सर्व शासकीय, महानगरपालिका आणि खासगी लसीकरण केंद्रांवरील कामगिरीचाही समावेश आहे.