नांदुर- दौंड तालुक्यातील पश्चिम पटट्यात औद्योगिक वसाहतीमध्ये करोना संक्रमन वाढत असल्याने अनेकांचे बळी गेले आहेत. या भागात अनेक गावांमधुन कामगार कंपनीमध्ये येत आहेत परंतु काही कंपन्यात कामगार करोनाबाधित आढळले आहे. त्यामुळे अजून जून जुन या परिसरात किती लोकांना जीव गमवावा लागणार याची चिंता सतावू लागली आहे.
नांदूर परिसरातील एका नामाकिंत कंपनीमुळे कामगारांना करोना झाल्याने या परिसरातील कामगार भयभीत झाले आहेत. दौंड तालुक्याच्या पश्चिम भागातील सहजपूर नांदूर औद्योगिक पट्ट्यामध्ये कोरोनाची लागण होण्यास पुन्हा मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली असुन या भागातील रुग्णाची संख्या तसेच इतर माहिती प्रशासन तसेच कामगार व्यवस्थापनाकडून लपवली जात आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
परीसरातील कामगाराच्या, नागरीकाच्या आरोग्याशी संबधित कंपनी प्रशासन खेळत असल्याचा आरोप ग्रामस्थामधुन करण्यात येत आहे.कोरोनाच्या पहिल्या टप्यामध्ये नांदुर औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीमध्ये अनेकास तर सहजपुर येथेही एकास कोरोना बाधा झाली आहे.
सध्या रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे बाधित व्यक्तींच्या संपर्कामध्ये आलेल्यांची संख्या जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही. रूग्णसंख्या वाढत असल्याने कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या या भागातील कंपन्यामध्ये असणारी रुग्णसंख्या लपवली जात असुन माहीती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप नांदुरचे ग्रामसेवक निलेश धारुरकर यांनी केला आहे.
मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित क्षेत्रातून कामगार कामाला येत आहेत. पण त्यांच्या सुरक्षेसंदर्भातील उपाययोजनाकडे लक्ष दिले जात नसल्याचे निदर्शनास येते असुन प्रशासनालाही माहीत दिली जात नाही. कंपनी व्यवस्थापन यांच्याशी संपर्क साधला असता नंतर सांगतो पाहातो असे सांगण्यात येत त्यामुळे नागरीकांच्या जिवांशी खेळणा-या कंपन्यांवर कारवाई करावी अशी मागणी या भागातील नागरिक करीत आहे. सध्या कामगारांना कोविडची लागण झाल्यास घरी पाठवले जात असुन ही बाब चिंताजनक आहे याबाबत कपन्यांनी उपाययोजना करण्याची गरज आहे.
याबाबत मी स्वता कंपनी व्यवस्थापन याच्याशी बोलो होतो. परंतु त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे या परिसरात अनेकांना जिव गमवावा लागला आहे. माहीती न देणाऱ्या कंपन्यांन वरीत करवाई करण्यात यावी
– उमेश म्हेत्रे, सामाजिक कार्यकर्ते, नांदूर