डेहराडून – उत्तराखंड मध्ये आज लागोपाठ दुसऱ्या दिवशीही मोठा पाऊस झाल्याने त्या राज्यातील चार धाम स्थळाची यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली आहे. यमुनोत्रीकडे निघालेल्या प्रवाशांना बडकोट, जानकीचट्टी येथे थांबण्यास सांगण्यात आले आहे.
गंगोत्रीकडे निघालेल्या यात्रेकरूंनी हरसिल, भटवारी, मनेरी येथे थांबण्यास सांगण्यात आले आहे. हवामान सुधारेपर्यंत केदारनाथ आणि बद्रीनाथ कडेही प्रवाशांनी जाऊ नये असेही त्यांना सांगण्यात आले आहे. बद्रीनाथ कडे जाणाऱ्या या यात्रेकरूंना जोशीमठ, चामोली येथेच थांबून राहण्यास सांगण्यात आले आहे.
केदारनाथच्या दिशेने गेलेल्या चार हजार भाविकांनाहीं खराब हवामानामुळे लिंचौली, भिमबली येथे थांबण्यास सांगण्यात आले आहे. चार धाम देवस्थान बोर्डाने म्हटले आहे की हवामान खात्याने 17 ते 19 ऑक्टोबर दरम्यान मोठ्या पावसाचा इशारा दिल्याने यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी ही यात्रा तात्पुत्या स्वरूपात थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून या यात्रेच्या स्थितीची माहिती घेतली.