कोल्हापूर(प्रतिनिधी) : पथदिवे व सार्वजनिक पाणी पुरवठयांचे वीज पुरवठा बंद करणाऱ्या महावितरणच्या विरोधात माणगावचे सरपंच राजू मगदूम यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातील महावितरण कार्यालयासमोर आंदोलनास सुरुवात झाली.
महावितरण कंपनीकडून चुकीच्या पद्धतीने पथदिवे व सार्वजनिक वीज पुरवठयाची वीज बिल वसुली सुरू आहे. महावितरणकडून वीज बिल वसुलीसाठी वीज पुरवठा खंडीत करण्यात येत आहे. या कारवाईच्या निषेधार्थ सरपंच मगदूम यांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार सोमवारी, (ता.१८ऑक्टोबर) सकाळी ११ वाजता उपोषणाला सुरुवात झाली.प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यांनतर उपोषणाला सुरुवात केली.
आंदोलनात उपसरंपच अख्तरहुसेन भालदार, अनिल नरसगोंडा पाटील, अभिजीत घोरपडे, प्रकाश पायगोंडा पाटील, रामगोंडा सिद्धगोंडा पाटील, अमोल पारीसा मगदूम, उमेश जोग, हिम्मत म्हालदार, फैय्याज मुल्ला, विराज व्हनागडे, गुंडू हेरवाडे, शिवगोंडा पाटील आदींचा सहभाग आहे. अतिश सनदी, अविनाश माने, शहाजहान सनदी, सुभाष कोळी, मुरलीधर कांबळे, सुनील चव्हाण, सतिश महाजन, रेंदाळचे सरपंच विजय माळी, रांगोळीचे सरपंच नारायण भोसले, अविनाश जगदाळे,दत्तात्रय बन्ने हे देखील आंदोलनात सहभागी आहेत. जिल्हा परिषद सदस्य विनय पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट दिली.