पुणे – करोनामुळे बंद असलेल्या शाळा पुन्हा उघडणार आहेत. यामध्ये इयत्ता 9 वी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबत प्रशासनाने मंजुरी देण्याचा निर्णय आरोग्य मंत्रालयाने घेतला आहे. हे मात्र खरे आहे. घंटा वाजणार, शाळा भरणार पण करोना कधी जाणार? असा सवाल विद्यार्थी, पालकांमधून विचारला जात आहे.
दि. 21 सप्टेंबरपासून शाळा सुरू होणार आहेत. कंटेन्मेंट झोनमधील विद्यार्थी व शिक्षकांना प्रवेश देण्यात येणार नाही. पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार का? याबाबत साशंकता आहे. शाळेत विद्यार्थी मास्क, सॅनिटायझर तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, हात धुणे बंधनकारक आहे. पूर्वी एका वर्गात 80 ते 100 विद्यार्थी बसत होते. परंतू आत्ता कसे नियोजन होणार याबाबत शाळा, महाविद्यालयांची कसरत होण्याची शक्यता आहे.