Entertainment: मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकर सध्या लग्नबंधनात अडकले आहे. नुकतेच प्रसाद जवादे-अमृता देशमुख आणि सुरुची अडाकर-पियुष रानडे लग्नबंधनात अडकले आहे. यानंतर आता ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेतील सत्तूची भूमिका साकारणारा अभिनेता विवाहबंधनात अडकला आहे. ८ डिसेंबरला त्याने पूजासोबत लग्नगाठ बांधली.
अभिनेता विनम्र भाबलचा मोठ्या थाटामाटात लग्न सोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याला ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील बऱ्याच कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. अभिनेत्री हृता दुर्गुळेसह रिना मधुकर, पूर्णिमा तळवलकर, प्राजक्ता परब असे अनेक कलाकार विनम्रच्या लग्न सोहळ्यात दिसले.
विनम्रच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो मराठी मालिकासह चित्रपट, नाटकांमध्ये झळकला आहे. सध्या त्याच रंगभूमीवर ‘राजू बन गया जेंटलमेन’ हे नाटक सुरू आहे. या नाटकात त्याच्यासोबत अंशुमन विचारे, उमेश जगताप, अमृता फडके ही कलाकार मंडळी देखील पाहायला मिळत आहे. यातच आता सोशल मीडियावर विनम्रचे लग्नाचे फोटो व्हायरल होत असल्याने सध्या त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.