पाटणा – बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपशी असलेल्या मैत्रीबद्दल अलिकडेच जे उद्गार काढले त्यावर कोणतीही प्रतिक्रीया देण्यास उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी नकार दिला आहे,
ते म्हणाले की, यावर चर्चेत काही अर्थ नाही, आणि त्यावर काही बोलण्यातही अर्थ नाही. राज्यातील आमच्या सरकारचे काम कार्यक्षमपणे चालत असून त्यात कोणतेही मतभिन्नता नाही.
त्यामुळे कोणाच्या कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करणे निरर्थक आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांबाबत बोलताना यादव म्हणाले, या निवडणुकांत काय होणार आहे हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. भाजप सर्व राज्ये गमावेल याची खात्री आहे असेही ते म्हणाले.
दरम्यान नितीशकुमार हे पुन्हा भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत आहेत या दाव्याचा भाजपनेही इन्कार केला आहे.