मुंबई – बॉलीवूडमध्ये भव्य पार्ट्या होतात. या पार्ट्यांमध्ये लाखो रुपयांचा खर्च केला जातो, याच पार्ट्यांबाबत अभिनेत्री तापसी पन्नूने खुलासा केला आहे,’बॉलीवूडच्या कितीही भव्य पार्ट्या झाल्या तरी प्रत्येकजण रिकाम्या हाताने पोहोचतो. भेटवस्तू घेऊन कोणी येत नाही. बर्थडे पार्टी असो वा सेलिब्रेशन पार्टी.’
तापसी पन्नूने एका मुलाखतीत सांगितले की, ‘बॉलीवूडचे लोक नेहमीच्या लोकांपेक्षा खूप वेगळे असतात. त्यांचे सामाजिक शिष्टाचार वेगळे आहेत. बर्थडे पार्टी असो की दिवाळी पार्टी, इथे कोणी कोणाच्या घरी भेटवस्तू घेऊन जात नाही.’ असे अभिनेत्रीने सांगितले.
तापसी पन्नूने सांगितले की, ‘ती शाहरुख खानच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी होते. पण जेव्हा तिला विचारले गेले की ती अभिनेत्यासाठी कोणती भेटवस्तू घेते तेव्हा तापसी म्हणाली की कोणी काय देईल? शाहरुखला कोणी काय देऊ शकेल? कोणी काही देत नाही. यासोबतच तापसी म्हणाली की, शाहरुखकडे सर्व काही असताना लोक त्याला काय देऊ शकतात.’
तापसीने बच्चन कुटुंबाच्या घरी होणाऱ्या दिवाळी पार्टीबद्दलही सांगितले. तापसी म्हणाली की,’बॉलीवूडमध्ये खूप कंजूष प्रकारचे लोक आहेत. याआधी ती पार्ट्यांमध्येही गिफ्ट्स घेऊन जायची, पण कोणीही गिफ्ट घेऊन येत नसल्याचे पाहून तिनेही ते घेणे बंद केले. तापसी म्हणाली की, मला खूप विचित्र वाटायचे. कदाचित मी एकच असे होते की जी भेटवस्तू घेऊन पोहोचत असायची. पण आता मी हे करत नाही.’