मुंबई – रायगड येथील आर्किटेक्ट अन्वय नाईक आणि त्याच्या आईच्या वर्ष 2018 मधील आत्महत्येसंदर्भात महाराष्ट्र पोलिसांनी अटक केलेल्या रिपब्लिक टीव्हीच्या अर्णब गोस्वामी यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. अर्णव यांना जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारला ही जोरदार चपराक असल्याचे सांगत जोरदार टीका केली.
राणेंचं मोठं विधान; म्हणाले, ‘दिवाळीनंतर ठाकरे सरकारचे…’
सोमय्या यांनी याबाबतची भूमिका मांडणारा एक व्हिडीओ जारी केला असून यामध्ये त्यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केलं आहे. सोमय्या म्हणतात, “अर्णव गोस्वामी यांना जामीन मंजूर होणे म्हणजे अन्यायाविरोधात न्यायाचा विजय आहे. ज्या प्रकारे मुंबई पोलीस कमिशनर यांच्यापासून गृहमंत्री अनिल देशमुख, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी आपल्या सत्तेचा राक्षसी दुरुपयोग केला. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने आज ठाकरे सरकारला चपराक लगावली आहे.”
#ArnabGoswami ko Bail, yane Thackeray Sarkar ko Tamacha. Ab to Thackeray Sarkar apni Satta ka Rakshasi Upyog Bandh Karengi!!?? #BJP@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis pic.twitter.com/QK89M0CMyH
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 11, 2020
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात याबाबतची सुनावणी सुरु असताना न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठाने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या याचिकेवर सुनावणी घेत टीव्ही अँकरच्या अटकेबद्दल महाराष्ट्र सरकारचे कान ओढले.
“नितीश कुमारांनी शरद पवारांच्या सल्ल्याने बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न राबवावा”
गोस्वामी यांच्या अटक आणि खटला पुन्हा सुरू करण्याच्या विरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर दोन दिवसांनी सुनावणी झाली. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. न्या. चंद्रचूड म्हणाले की, मी गोस्वामी यांचा चॅनल पहात नाही. मात्र, प्रत्येकाला त्याचे म्हणून काही म्हणणे असते की नाही? उच्च न्यायालयांनीही आपले निर्णय देताना घटनात्मक तारतम्य बाळगले पाहिजे, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयांवरही ताशेरे ओढले.