चंदीगड – शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीरसिंग बादल यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर आजपर्यंतची सगळ्यांत प्रखर टीका केली आहे. भगवंत मान यांना शीखांचा इतिहासच माहिती नसल्यामुळे आपण मान यांना शीख मानत नाही. त्यांना आपण जेंव्हा पाहतो किंवा ऐकतो तेंव्हा आपल्याला खूप दु:ख होते, असे बादल यांनी म्हटले आहे.
राजधानी दिल्लीत शीख समुदायाच्या बैठकीत बोलताना बादल यांनी इतरही अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. बादल म्हणाले की देशातील मुस्लिमांची लोकसंख्या जवळपास १८ टक्के आहे. मात्र त्यांच्याकडे नेतृत्व नाही, त्याचे कारण एकजुट न होणे हे आहे.
शीख समुदाय केवळ २ टक्के आहे. तथापि, श्री अकाल तख्त साहिबच्या अंतर्गत सगळे एकजुट आहेत. आज पंजाबमधील आम आदमी पार्टीचे सरकार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालच चालवत आहेत. भगवंत मान नव्हे तर केजरीवालच पंजाबचे मुख्यमंत्री असून ते पंजाबची लूट करत आहेत.