बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुखनचा मोठा चाहता वर्ग आहे. अनेकजण त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र २०१८ मध्ये साधारण चार वर्ष त्याने चित्रपटातून ब्रेक घेतला होता. याच काळात शाहरुखचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यावेळी या प्रकरणामुळे तो चांगलाच चर्चेत आला होता. मात्र त्यानंतर शाहरुखने ‘पठाण’ चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दमदार पुनरागमन केले.
शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. सुरुवातील या चित्रपटातील एका गण्यवरून वाद झाल्याचे देखील पहायला मिळाले होते. मात्र तरीही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ५७.०५ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर जगभरात या चित्रपटाने १००० कोटींचा रेकॉर्ड ब्रेक गल्ला जमवला. परंतु आता शाहरुखचा नुकताच प्रदर्शित झालेला जवान हा चित्रपट पठानचा रेकॉर्ड मोडू शकतो असे म्हंटले जात आहे. ७ सप्टेंबर रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने अवघ्या दोनच दिवसात २०० कोटींची कमाई केली आहे.
दिग्दर्शक अॅटली यांच्या जवान या चित्रपटात ठासून मसाला भरल्याचे दिसते. यातील शाहरुखच्या विविध रूपाने प्रेक्षकही अचंबित होतात. या चित्रपटात तो पहिल्यांदाच बाल्ड लुकमध्ये दिसला आहे. देशातील राजकीय परिस्थिती आणि देशाला भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांपैकी काही प्रश्नांची रोखठोक उत्तर यातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शाहरुखच्या भूमिकेसह अॅटली यांनी केलेल्या दिग्दर्शनाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
एकीकडे जवान चित्रपट सुपरहीट होत असतानाच सनी देओलच्या ‘गदर 2’ने देखील बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. सनी देओलने ‘गदर 2’च्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली. तब्बल 22 वर्ष प्रेक्षकांना गदर 2 ची वाट पाहावी लागली. 2001 मध्ये जेव्हा ‘गदर : एक प्रेम कथा’ प्रदर्शित झाला तेव्हा चित्रपटातील काही दृश्यांनंतर देशातील शहरांमध्ये हिंसाचार झाला होता. हा चित्रपट राष्ट्रवाद, धर्म आणि अस्मितेच्या मुद्द्यांवर संभ्रम निर्माण करतो, फाळणीच्या वेदना नीटशा दाखवल्या गेलेल्या नाहीत, असेही म्हटले होते.
२००१ मध्ये जेव्हा ‘गदर : एक प्रेम कथा’ प्रदर्शित झाला तेव्हा चित्रपटातील काही दृश्यांनंतर देशातील शहरांमध्ये हिंसाचार झाला होता. हा चित्रपट राष्ट्रवाद, धर्म आणि अस्मितेच्या मुद्द्यांवर संभ्रम निर्माण करतो, फाळणीच्या वेदना नीटशा दाखवल्या गेलेल्या नाहीत, असेही म्हटले होते. या दोन्ही चित्रपटांनी सनी देओलच्या सिनेकारकिर्दीतील यशाचा आलेख जबरदस्त उंचावला. या सिनेमाने फार कमी काळात बॉक्स ऑफिसवर ५०० कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. सलग २६ दिवस हा चित्रपट चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. अनेकदा सिक्वेल चित्रपट अपयशी होत असल्याचेही पाहायला मिळाले आहे. मात्र गदरच्या दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
‘जवान’ आणि ‘गदर २’ या चित्रपटाच्या यशानंतर एक गोष्ट लक्षात येते की, आजही १९ व्या शतकातील अभिनेत्यांची क्रेझ संपलेली नाही. वयाची पन्नाशी ओलंडलेल्या शाहरुखचे जवान आणि पठाण दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरले. त्यानंतर वयाची साठी ओलंडलेल्या सनीने देखील दमदार कामगिरी करत आपल्या अभिनयाची जादू पुन्हा एकदा प्रेक्षकांना दाखवून दिली आहे. अर्थातच या अभिनेत्यांच्या अभिनयासह चित्रपटेच्या कथेलाही तितकेच महत्त्व देणे आवश्यक आहे.