नवी दिल्ली : भारत सरकारच्या मालकीची एनएमडीसी स्टील ही कंपनीही विक्रीला काढण्याचे सरकारने ठरवले आहे. अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, या स्टील प्लांटमध्ये ब्लास्ट फर्नेस सुरू झाल्यानंतरच या उद्योगाचे खासगीकरण करण्यासाठी आर्थिक निविदा मागवल्या जाण्याची शक्यता आहे. स्टील प्लांटची ब्लास्ट फर्नेस कार्यान्वित झाल्यानंतर कंपनीचे मूल्य वाढेल अशी अधिकाऱ्यांची अपेक्षा आहे.
या प्रकल्पाची वार्षिक उत्पादन क्षमता 3 दशलक्ष टन असणे अपेक्षित आहे.ही भारतातील सर्वात मोठी स्टील कंपनी आहे. या कंपनीत सरकारची 60.79 टक्के हिस्सेदारी आहे. ही कंपनी छत्तीसगड मध्ये आहे आणि यातील उर्वरित 39.21 टक्के हिस्सा जनतेकडे आहे.सरकारकडे असलेला 50.79 टक्के हिस्सा विकला जाणार आहे. त्यामुळे हा हिस्सा खरेदी करणाऱ्यांना या कंपनीचे नियंत्रण मिळणार आहे.
ही कंपनी खरेदी करण्यासाठी अनेक गुंतवणूकदारांनी स्वारस्य दाखवले आहे. एनएमडीसी स्टील कंपनीचे शेअर्स या वर्षी फेब्रुवारीमध्ये स्टॉक एक्स्चेंजमध्ये 30.25 रुपयांवर नोंदवले गेले होते. सध्या सुमारे 44 रुपये प्रति समभागावर व्यवहार होत आहेत.
सध्याच्या बाजारभावानुसार, 50.79 टक्के स्टेक विकून सरकारला सुमारे 6,500 कोटी रुपये मिळतील. दोन वर्षांपुर्वीच ही कंपनी विकण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. ही प्रक्रिया या वर्षाच्या अखेरीला पुर्ण होईल अशी अपेक्षा आहे.