श्रीनगर – आम्ही महात्मा गांधींच्या भारताशी हातमिळवणी केली होती नाही की त्यांचा मारेकरी नथुराम गोडसेच्या भारताशी. देशातील काही शक्ती गांधींच्या भारताला गोडसेचा भारत करण्याच्या प्रयत्न करत मात्र आम्ही ते होऊ देणार नाही आणि देशाच्या कानाकोपऱ्यात त्यांचा विरोध करू अस म्हणत पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मूच्या जनतेला काश्मीरशी मजबूत संबंध ठेवण्याचे आवाहन केले आहे.
त्या पुढे म्हणाल्या ‘आज जे काश्मिरात बदल होत आहे ते हिंसक बदल एका रात्रीत झाले नाही. हे तेच लोक होते ज्यांनी फाळणीच्या वेळी पाकिस्तानपेक्षा लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष भारताला प्राधान्य दिले. भाजपाचे नाव न घेता, त्या पुढे म्हणाल्या की, जे लोक कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये सर्व काही ठीक झाले आहे.
आज काश्मीर दुःखात आहे. झालेली जखम आणखीनच वाढत चालली आहे आणि काश्मीर आपल्यापासून दूर जात आहे,” असे मुफ्ती यांनी वकिलांशी संवाद साधताना म्हणाल्या. भाजपाचे नाव न घेता, त्या म्हणाल्या की “जे लोक कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये सर्व काही ठीक झाले आहे. असा खोटा गैर समज पसरवत आहे. ते खोटे दावे करत आहेत. कारण जम्मू-काश्मीरमध्ये वास्तविक परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही.” असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.