नवी दिल्ली – देशातील करोना विषाणूला रोखण्यासाठी लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. त्यापार्श्वभूमीवर सर्वच स्तरावर लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली जात असून, आतापर्यंत 113 कोटींहून अधिक लसींचे डोस देण्यात आले आहेत.
काल 67 लाख 82 हजार 42 डोस देण्यात आले आहे. या भयानक विषाणूला रोखण्यासाठी लस घेणे हा एकमात्र पर्याय असून, देशातील प्रत्येक नागरिकाला लस घेणे बंधनकारक केले आहे.
“ज्यांनी अजूनही लस घेतली नाही, त्यांनी लवकरात लवकर लस घेतली पाहिजे. जर कोणी लस घेण्याचं टाळत असेल, तर सध्या हा सर्वात मोठा धोका आहे’. असं सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आणि करोना प्रतिबंधक लस बनविणारे अदर पुनावाला यांनी म्हंटलं आहे.
“आज राज्यांमध्ये 200 दशलक्षाहून अधिक डोस उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्हा सर्वांना विनंती आहे की, ज्यांनी आतापर्यंत लस घेतलेली नाही त्यांनी लवकरात लवकर लसीचा डोस घ्यावा. लस उद्योगानं राष्ट्रासाठी पुरेसा लस साठा उपलब्ध करुन देण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. “असं देखील पुनावाला म्हणाले.