नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर घणाघाती हल्ला चढवला आहे. काँग्रेस आणि त्यांचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर टीका केली. यावरून स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेत्यांनी देशाच्या राष्ट्रपती आणि देशाची माफी मागावी. असे म्हटले आहे, काँग्रेसने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना उमेदवार म्हणून कठपुतली म्हटले आहे. आणि अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींना पत्नी म्हणून संबोधले आहे. काँग्रेस नेत्यांच्या या टीकेवर स्मृती इराणी यांनी पत्रकरांशी बोलतांना प्रतिउत्तर दिले आहे.
Media Briefing by Union Minister Smt. @smritiirani in New Delhi. https://t.co/9GeNw0af9y
— BJP (@BJP4India) July 28, 2022
काँग्रेसवर हल्लाबोल करताना स्मृती इराणी पुढे म्हणाल्या की, ‘काँग्रेस आदिवासीविरोधी, गरीबविरोधी आणि महिलाविरोधी आहे. हे देश आणि जगाला माहीत आहे, मात्र काँग्रेसची अधोगती एवढी झाली की, आदिवासी आणि गरीब कुटुंबातील महिलांवर ते आता अशा प्रकारची टीका करत आहे. देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदाचा अनादर करणे, त्यांच्या प्रतिष्ठेवर आघात करणे मला अजिबात मान्य नाही.
त्या पुढे म्हणाल्या, ‘सोनियाजींच्या अध्यक्षतेखालील काँग्रेस पक्षावर हे संस्कार झाले आहेत. अधीर रंजन चौधरी यांना हे माहीत आहे की हे संबोधन भारताच्या प्रत्येक मूल्याच्या, प्रत्येक संस्काराच्या विरोधात आहे, तरीही त्यांनी द्रौपदी मुर्मूजींना पत्नी म्हणून संबोधले. मला हे अजिबात मान्य नाही. काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रपतींसह राष्ट्रपतींसह सर्व देशातील नागरिकांची माफी मागावी.’ असेही त्या म्हणाल्या आहे.