देऊळगावराजे -भाजप नेते वीज पुरवठा बंद केला म्हणून भाजप नेते रस्त्यावर उतरले आहेत. पण ते कारखाना बंद झाला म्हणून रस्त्यावर का उतरले नाहीत, असा सवाल माजी आमदार रमेश थोरात यांनी आमदार राहुल कुल यांना केला.
देऊळगावराजे येथे जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे आणि ग्रामपंचायत 15 व्या वित्त आयोगातून मंजूर झालेल्या 1 कोटी 41 लाख रुपये किमतीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळा आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी माजी आमदार रमेश थोरात यांनी भीमा पाटस कारखाना सुरू करण्यासाठी 33 कोटी आले.
पण कारखाना मागील चार वर्षापासून बंद आहे. या कारखान्याचा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या मार्फत लवकरच लिलाव केला जाईल. तो येथे उपस्थित असलेल्या कोणाला घ्यायचा आहे, असा टोला त्यांनी कुलांना अपत्यक्षपणे लगावला.
शेतकऱ्यांच्या वीजप्रश्नी पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले जिल्हा परिषदेचे अध्यक्षा निर्मला पानसरे म्हणाल्या की, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून विविध विकास कामे होत असताना त्या कामांचा दर्जा चांगला करुन घेणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, पांडुरंग मेरगळ, पंचायत समिती सभापती हेमलता फडके, उपसभापती विकास कदम,
पंचायत समिती सदस्या ताराबाई देवकाते, बादशहा शेख, गुरुमुख नारंग, दीपक सोनवणे, इंद्रजीत जगदाळे, बाळासाहेब बागल, विठ्ठल बाराते, अजय गोरे, सुभाष नागवे, बाळासाहेब इंदलकर, सरपंच स्वाती गिरमकर, उपसरपंच नारायण गिरमकर, सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. अमित गिरमकर यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन दिनेश पवार यांनी केले.
दौंड शुगरकडून गाळप यंत्रणा वाढविणार
सध्या दौंड शुगर कारखाना कार्यक्षेत्रात ऊस जास्त राहिला, असे सर्व शेतकरी म्हणत आहेत. पण आता गटात तोडणी प्रोग्राम वाढवणार आहे. येत्या 25 मार्चपर्यंत बराच ऊस गाळप पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल तसेच आजपर्यंत कारखान्याचे 9 लाख टन ऊस गाळप पूर्ण झाले असल्याचे संचालक वीरधवल जगदाळे यांनी सांगितले.