रेडा- करोना व्हायररसमुळे गरीब, निराधार व परप्रांतीय मजुरांच्या घरातील चूल पेटविण्याचे काम श्री गणेश पतसंस्थेच्या माध्यमातून संस्थेचे चेअरमन किशोर पवार व उपाध्यक्ष भारत गांधी करीत आहेत, असे प्रतिपादन इंदापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती देवराज जाधव यांनी केले. निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील श्री गणेश ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने आयोजित गहू व तांदुळ वाटपावेळी ते बोलत होते.
यावेळी नीरा- भीमा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, केतकीचे माजी सरपंच व सुवर्णयुग पतसंस्थेचे चेअरमन दशरथ डोंगरे, इंदापूर पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष निलकंठ मोहिते, माजी अध्यक्ष नानासाहेब चांदणे, श्री केतकेश्वर पतसंस्थेचे चेअरमन गोरख आदलिंग, हवालदार वाघमारे, संचालक डॉ. सुदर्शन दोशी, तलाठी गोरक्षनाथ इंगळे, ग्रामविकास अधिकारी अमोल मिसाळ, राजकुमार घाडगे, कांतिलाल शेंडे, महेश पाटील, मोबिन पठाण, जालिंदर शहाणे, ठेकेदार सोमनाथ राऊत, विकी पवार, सचिव उद्धव पांढरे उपस्थित होते.
यावेळी चारशेहून अधिक कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आले. काळामळा व व्याहळी येथील वीस कुटुंबांना घरपोच धान्य देण्यात आले. हा उपक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी दादाराम जाधव, योगेश हिंगाणे, बाबासाहेब वडापुरे, सोमनाथ राऊत, प्रसाद भोंग, सुजाता फुटाणे, संगीता शिंदे, रफिक काझी,किरण राऊत, संकेत पवार, प्रसाद केशरे यांनी काम केले.