बंगळुरू : बंगळुरू : चांद्रयान-3 मोहिमेत सहभागी शास्त्रज्ञांना भेटण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी बंगळुरूमधील इस्रोच्या कमांड नेटवर्क मिशन कंट्रोल कॉम्प्लेक्समध्ये दाखल झाले होते. चांद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रो टीमच्या आणि चांद्रयानच्या टीममधील सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. दरम्यान,यावेळी पंतप्रधान मोदींनी मोठी घोषणा केली. चांद्रयान-3 चंद्रावर ज्याठिकाणी लँड झालं, त्या ठिकाणाला आता ‘शिवशक्ती पॉइंट’ असे नाव दिले जाणार आहे. यासोबतच, चांद्रयान-2 मधील लँडर ज्याठिकाणी क्रॅश झाले, त्या ठिकाणाला ‘तिरंगा’ या नावाने ओळखले जाणार असल्याची घोषणा यावेळी मोदींनी केली.
‘चांद्रयान-3’ मोहीम यशस्वीपणे पार पाडून भारताने जागतिक स्तरावर एक मोठा विक्रम केला आहे. 23 ऑगस्ट रोजी जेव्हा चांद्रयान-3 चंद्रावर लँड झाले, तेव्हा पंतप्रधान मोदी ब्रिक्स समिटसाठी दक्षिण आफ्रिकेत होते. त्यानंतर ते ग्रीस दौऱ्यावर गेले. यानंतर भारतात आल्यावर त्यांनी थेट इस्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेत, चांद्रमोहिमेच्या यशासाठी त्यांचे अभिनंदन केले.
#WATCH | The spot where Chandrayaan-3’s moon lander landed, that point will be known as ‘Shivshakti’, announces Prime Minister Narendra Modi at ISRO Telemetry Tracking & Command Network Mission Control Complex in Bengaluru pic.twitter.com/1zCeP9du8I
— ANI (@ANI) August 26, 2023
पंतप्रधान मोदींनी आज इस्रोच्या शास्त्रज्ञांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या शास्त्रज्ञांचे अभिनंदन आणि कौतुक केले. सोबतच त्यांनी एक मोठी घोषणा केली. चांद्रयान-3 मधील विक्रम लँडर चंद्रावर ज्याठिकाणी उतरलं आहे; त्या जागेला आता ‘शिवशक्ती पॉइंट’ म्हटले जाणार आहे.
#WATCH | Karnataka | Prime Minister Narendra Modi says, “The spot on the lunar surface where the Chandrayaan-2 left its footprints will be known as ‘Tiranga’. This will be an inspiration for every effort made by India. it will remind us any failure is not final…” pic.twitter.com/Ubk0IkXVXL
— ANI (@ANI) August 26, 2023
यावेळी बोलताना पंतप्रधानांनी आणखी एक मोठी घोषणा केली. भारताची दुसरी चांद्रमोहीम ही अखेरच्या टप्प्यात जाऊन अयशस्वी झाली होती. चांद्रयान-2 मधील विक्रम लँडर हे चंद्रावर क्रॅश झाले होते. हे लँडर ज्याठिकाणी क्रॅश झालं, त्या जागेचंही नाव पंतप्रधानांनी जाहीर केले. या जागेला आता ‘तिरंगा पॉइंट’ म्हणून ओळखले जाणार आहे.
पुढे बोलताना त्यांनी ‘हे खरंतर चार वर्षांपूर्वीच ठरले होते, मात्र चांद्रयान-3 मोहिमेनंतरच एकदमच दोन्ही नावांची घोषणा करण्याचा विचार आपण केला, असं मोदींनी म्हटलं भारताने चांद्रमोहीम यशस्वी करण्यासाठी केलेल्या प्रत्येक प्रयत्नाची आठवण हे नाव आपल्याला करुन देईल. अपयश हा शेवट नसतो, हे या नावातून आपल्याला कळेल; असेही मोदी यावेळी म्हणाले.