India vs South Africa 1st Test Day 3 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनमध्ये खेळवला जात आहे. आज (गुरुवार) सामन्याचा तिसरा दिवस आहे. पहिल्या डावात भारतानं 245 धावा केल्या होत्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव तिसऱ्या दिवशी 9 विकेट पडल्यानंतर 408 धावांवर आटोपला आणि दक्षिण आफ्रिकेला 163 धावांची आघाडी मिळाली.
कर्णधार टेंबा बावुमा दुखापतीमुळे फलंदाजीला आला नाही. त्याला एब्सेंट हर्ट आउट घोषित करण्यात आले. यजमान संघाकडून डीन एल्गरने सर्वाधिक 185 धावा केल्या. याशिवाय मार्को यान्सेन 84 धावा करून नाबाद माघारी परतला. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 बळी घेतले. मोहम्मद सिराजने 2 बळी घेतले. शार्दुल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा आणि रवी अश्विन यांना प्रत्येकी 1 यश मिळाले.
भारतीय संघाच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. मात्र, टीम इंडियाची सुरूवात खराब झाली आहे. टीम इंडियाचे 2 फलंदाज (रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल) संघाची धावसंख्या 13 असताना माघारी परतले. त्यानंतर लगेगच संघाच्या 52 धावांवर भारताला तिसरा (शुभमन गिल) आणि खूप मोठा धक्का बसला आहे. सध्या भारतीय संघ 111 धावांनी पिछाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडिया पूर्णपणे बॅकफूटवर गेलेली दिसत आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा चहापानाच्या वेळेपर्यंत भारताने तीन गड्यांच्या मोबदल्यात 62 धावा केल्या आहेत. विराट कोहली 18 आणि श्रेयस अय्यर सहा धावांवर नाबाद आहे.
Tea on Day 3 of the 1st Test #TeamIndia 245 & 62/3, trail South Africa (408) by 101 runs.
Scorecard – https://t.co/032B8Fn3iC #SAvIND pic.twitter.com/TovDjiXGnG
— BCCI (@BCCI) December 28, 2023
रोहित शर्माशिवाय यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल पॅव्हेलियनमध्ये गेले आहेत. दक्षिण आफ्रिकेकडून आतापर्यंत कागिसो रबाडा, नांद्रे बार्डर आणि मार्को यान्सेन यांना प्रत्येकी 1 यश मिळाले आहे.
भारताला तीन धक्के….
दुसऱ्या डावात रोहित शर्माची बॅट चालली नाही. तो खाते न उघडताच बाद झाला. तिसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर कागिसो रबाडाने त्याला क्लीन बोल्ड करत पहिला धक्का दिला. त्यानंतर यशस्वी जैस्वालही पॅव्हेलियनमध्ये परतला . नांद्रे बर्जरच्या चेंडूवर तो यष्टिरक्षक काइल व्हेरेयनकरवी झेलबाद झाला. यशस्वीने 18 चेंडूत पाच धावा केल्या. दुसऱ्या डावात शुभमन गिलची बॅट चालली नाही. चांगल्या सुरुवातीनंतर त्याने आपली विकेट गमावली आणि भारताला तिसरा व महत्वपूर्ण धक्का बसला. शुभमनने 37 चेंडूत 26 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत सहा चौकार मारले. मार्को जॅन्सनने त्याला क्लीन बोल्ड केले.