पाथर्डी – मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी तालुका सकल मराठा समाजातर्फे शहरातील वसंतराव नाईक चौकामध्ये बैठा सत्याग्रहास काल (सोमवार)पासून सुरुवात करण्यात आली.
मराठा आरक्षण मिळाले पाहिजे, एक मराठा लाख मराठा, कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही अशा घोषणांनी आंदोलनकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. लक्ष्मण डांगे, सोमनाथ बोरुडे, बंडू पाटील बोरुडे, देवा पवार, अप्पासाहेब बोरुडे, रामदास बर्डे, उद्धव माने, सोमनाथ माने, चांद मणियार, संतोष वाघमारे, बबलू वावरे, राजेंद्र नांगरे, विवेक देशमुख, विजय ढाळे, सुनील लाटणे, विष्णुपंत वाखुरे आदींनी या आंदोलनाला पाठिंबा देत निदर्शने केली.
या वेळी बंडू पाटील बोरुडे म्हणाले की, जालन्याच्या घटनेनंतर राज्यभर याचे प्रतिसाद उमटून मोठा वणवा पेटला आहे.
जरांगे पाटील यांची रास्त मागणी असून, त्यांचं एकच म्हणणं आहे की सरसकट मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे. परंतु सरकार आणि पुढारी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून तालुक्यातील सकल मराठा समाजाने वेगवेगळ्या पद्धतीने हे आंदोलन सुरू ठेवावे, असे आवाहन बोरुडे यांनी केले. लक्ष्मण डांगे, रामदास बर्डे, सोमनाथ बोरुडे, सोमनाथ माने, उद्धव माने यांच्या प्रमुख पुढाकाराने बैठा सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले आहे.