Sanjay Nirupam -BJP। देशातील सर्वात जुना पक्ष असणाऱ्या काँग्रेस पक्षाला सध्या गळती लागल्याचे दिसतंय.मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी आणि अशोक चव्हाण या तिन्ही नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. याच नेत्यांच्या यादीत आणखी एका काँग्रेस नेत्याचे नाव येण्याची शक्यता वर्तवण्यात येतीय.
एक व्यक्ती गेला की बाकी सर्वांबाबत अफवा Sanjay Nirupam -BJP।
काँग्रेसचे नेते संजय निरुपम हे पक्षाला सोडचिट्ठी देत भाजपच्या वाटेवर जाणार असल्याचे म्हटले जातंय. यावर बोलताना संजय निरुपम म्हणाले, “मी इतर पक्षात जाणार असल्याच्या अफवा सुरू आहेत. एक व्यक्ती गेला की बाकी सर्वांबाबत अफवा पसरतात. आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहोत. आम्ही जमिनीवर काम करणारे कार्यकर्ते आहोत. आणि यापुढेही काम करत राहणार राहणार”, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
माझी कोणाबरोबरच चर्चा झाली नाही Sanjay Nirupam -BJP।
दरम्यान, संजय निरुपम यांची मिलिंद देवरा, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चा झाल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात आहे. याबाबत ते म्हणाले, “माझी कोणाबरोबरच चर्चा झाली नाही. मी चॅलेंज देतो की माझी कोणाबरोबरच चर्चा झाली नाही. अफवा पसरवू नका.” असे त्यांनी थेट म्हटले.
तोपर्यंत कोणत्याही पक्षाकडून दावा करणं चुकीचं
शिवसेनेकडून मुंबईत चार मतदारसंघात दावा केला आहे. याबाबत संजय निरुपम म्हणाले, “शिवसेनेकडून चुकीचा प्रयत्न सुरू आहे. आतापर्यंत महाविकास आघाडीच्या तीन बैठका झाल्या आहेत. या बैठकीत अद्यापही जागावाटपाबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. २२ तारखेला काँग्रेसची निवडणूक समितीची बैठक आहे. जोपर्यंत अंतिम निर्णय येत नाही, तोपर्यंत कोणत्याही पक्षाकडून दावा करणं चुकीचं आहे. हे कोणत्याही आघाडीच्या नियमांचं उल्लंघन आहे”, असे म्हणत संजय निरुपम यांनी ठाकरे गटाला घरचा आहेर दिला आहे.