मुंबई – बॉलिवूडचा मोस्ट एलिजिबल बॅचलर सलमान खान लग्न कधी करणार ही चर्चा नेहमीच सुरू असते. अनेक कार्यक्रमात त्याला त्याच्या लग्नाविषयी विचारलं जातं. अनेक अभिनेत्रींशी त्याचं नावही जोडलं जातं. त्यावर तो थातूरमातूर उत्तर देऊन वेळही मारून नेतो. अनेक अभिनेत्रींशी सलमान खान याचं नावही जोडलं गेलं पण त्यापैकी कोणाशीही अद्याप त्याचं लग्न झालेलं नाही. त्यामुळे त्याच्या लग्नाविषयीचं कुतुहुल कायम वाढत जातं. मात्र यावेळी वृत्तमाध्यमांनी लग्नाविषयी विचारले असता सलमानने विवाहसंस्था मृतावस्थेत असल्याचे स्पष्ट केले आहे.
सलमान विवाहसंस्थेबद्दल आपले मत सांगितले की, ‘माझा विवाहात विश्वास नाही. ही एक मृतावस्थेतील संस्था आहे असं मला वाटतं. माझा विवाहावर कोणत्याही प्रकारचा विश्वास नाही.” दरम्यान, सलमान खान आणि अभिनेत्री कतरीना यांचा मोस्ट अवेटेड ‘भारत’ चित्रपट ५ जूनला ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारत’ चित्रपट हिंदीशिवाय, तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे.